जळगावसामाजिक

गिरणा धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गिरणा धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चाळीसगांव, : पाटबंधारे उपविभाग चाळीसगांव अंतर्गत असलेल्या गिरणा मोठ्या प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या वाढत्या आवकेच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९.०० वाजता धरणाचा विसर्ग १२,३८० क्युसेक्सवरून वाढवून १४,८५६ क्युसेक्स (४२०.४२५ क्युमेक्स) करण्यात आला आहे. सध्या गिरणा धरणाचे वक्रद्वार क्रमांक १ ते ६ हे प्रत्येकी ६० सेंमी ने उघडे ठेवण्यात आले आहेत.
धरणात येणारी पाण्याची आवक वाढत असल्याने गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे ही वाढ अपरिहार्य झाली आहे. धरणात पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अभियंता यांनी दिली. गिरणा धरण, जे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून १८.४८७ टीएमसी क्षमतेचे आहे, हे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे आणि शेती सिंचनाचे प्रमुख स्रोत आहे.

या धरणाने १५ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण क्षमतेने भरले असून, सध्या अतिरिक्त पाणी विसर्ग करत आहे, ज्यामुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांना लाभ होत आहे.

नदीकाठावरील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि धरण अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने स्थानिक प्रशासनासह समन्वय साधून पूर नियंत्रणाची तयारी केली असल्याचेही सांगितले.
उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button