गुन्हेजळगाव

एसटीची दुचाकीला धडक तरुण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी 

एसटीची दुचाकीला धडक तरुण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी 

बामणोद गावाजवळील घटना

भुसावळ, प्रतिनिधी –कामानिमित्त बामनोद येथे आलेले तिघे मित्र हे जळगाव कडे परत जात असताना समोरून येणाऱ्या भरदार एसटी बसने त्यांना वळण रस्त्यावर जोरदार धडक दिल्याने यामध्ये दुचाकी वरील जळगाव चा तरुण जागीच ठार झाला असून त्याचे इतर दोन मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर घडली.

मयूर अण्णा गवळी असे जागीच ममयततरुणाचे नाव असून त्याचे इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मयत मयूर अण्णा गवळी हे जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाजवळ गुळाची ‘महाबासुंदी’ नावाने चहा विक्रीचा व्यवसाय करत होते. रविवारी ते आपले मित्र जयेश पाटील आणि गोयर यांच्यासोबत दुचाकीवरून बामणोद येथे गेले होते. तेथून परत येत असताना रस्त्याच्या वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव  एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मयूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या अपघातात जखमी झालेल्या जयेश पाटील आणि गोयर यांना तात्काळ भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मयूर गवळी हे जळगावात ‘महाबासुंदी’ चहा विक्रेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा मनमिळाऊ, हसतमुख स्वभाव आणि मदत करण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच अनेक नातेवाईक, मित्र आणि परिचितांनी घटनास्थळी गर्दी केली. मयूर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button