
पाकचे शेपूट वाकडेच युद्ध विराम नंतर रात्री हल्ले!
भारताचा पाकिस्तानला कडक इशारा
नवी दिल्ली जळगाव मीडिया न्यूज डेस्क l
पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी काल दुपारी ३.३५ वाजता भारताच्या डीजीएमओंशी फोनवर चर्चा केली. या चर्चेत दोन्ही देशांनी गोळीबार, लष्करी, हवाई आणि समुद्री कारवाई संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्यावर सहमती दर्शवली . मात्र या करारानंतर रात्री आठ वाजेपासून पाकिस्तानने पंजाब जम्मू कश्मीर आणि राजस्थानच्या अनेक सीमा वरती भागांमध्ये ड्रोन हल्ले आणि गोळीबार केला. अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने युद्ध विरामचे उल्लंघन केले.
पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना शुक्रवारी रात्री उशिरा भारताने त्यांच्या अकरा लष्करी तळांवर मोठे आणले केले. यामुळे पाकिस्तान लष्कराने घाबरून अमेरिका तुर्की आणि सौदी अरेबिया कडून मदत मागितली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री वारकूर अभियोग व उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अशी मुनीर यांना चिंतामणी देणे थांबवण्याचा सल्ला दिला.
यानंतर पाकिस्तानच्या विनवणीनंतर युद्धबंदीच्या तीन तासानंतर पाकिस्तानने आपली औकात दाखवून पुन्हा भारतावर सीमावरती भागामध्ये ड्रोन व गोळीबार करून हल्ला केल्यामुळे भारत आता काय भूमिका घेतो हे लवकरच समजणार आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला होता. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर प्रत्युत्तर दिल्यानंतर सीमेलगत शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू झाले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रविराम लागू झाला. याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घोषणा केली. जयशंकर यांनी पाकिस्तानने लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शवल्याचे सांगितले, पण दहशतवादाविरोधात भारत कोणतीही कृती सहन करणार नाही, असा इशारा दिला.मात्र, शस्त्रविरामानंतर अवघ्या काही तासांत पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली. भारताच्या सीमेवर ड्रोन दिसल्याच्या घटनेनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रात्री ११ वाजता पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला कडक इशारा दिला. “पाकिस्तानने परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यावे,” असे मिस्री म्हणाले.